आषाढी यात्रेनंतर वाळवंट वाऱ्यावर: भाविकांची सुरक्षा विठ्ठल भरवशावर
आषाढी एकादशीची महायात्रा संपल्यानंतर पंढरपुरातील चंद्रभागेचे वाळवंट दुर्लक्षित झाले आहे. आज श्रावण पुत्रदा एकादशीनिमित्त हजारो भाविक दर्शनासाठी आले असताना, सुरक्षेचे कोणतेही उपाय नसल्याने भाविकांची सुरक्षा केवळ विठ्ठलाच्या भरवशावर आहे.